Saturday, 31 December 2016

देव मांडार इलो (Jaitir Dev)

बांध वेणी.. घाल माझ्या, केसात झेलो
चल गे आये बेगी बेगी देव मांडार इलो          ..धृ

आबोलीची फुलां ..सगळी काढलय
देवाक थोडी काढून बाजूक ठेयलय
देवाक न्हेवच्याशिवाय दादा इसरान गेलो         ..१

वाघेरीच्या डोंगरातून साद येता
सेळीतून कोणी लगाबगा जाता
सगळीजनां जमली त्येनी नट्टोपट्टो केलो          ..२

मुंबैत्सून इलो काल शेजारचो दाजी
आवडता त्याका फणसाची भाजी
माका सांगान त्येनी आपलो एक फणस हेलो    ..३

दाजी आसा अगदी साधो भोळो
बघित त्या सगळ्यांका लायता लळो
बोलाकसुद्धा म्येळाना सोबत त्येचो चेलो         ..४

येताला खाजा, खडखडे लाडू
चाकरमान्यांका कितके गे हाडू
मोठ्या गावकारान् घेतलो खांद्यार शेलो           ..५

                                 -भिवा रामचंद्र परब

 (ध्वनीमुद्रिका : ऐका जैतीर देवाची कहाणी) 

तुळस गांव वसला (Jaitir Dev)

चहुबाजुला डोंगर हिरवे..
मध्ये तुळस गांव वसला
साऱ्या गावाच्या दर्शनाला..
देव जैतीर बसला                      ..धृ

साथीला आहे देव भूतनाथ
भक्तांशी बोलतो रवळनाथ
पाची तत्वांचा घालून मेळ..
तो काळजात घुसला                  ..१

आदिमाया सातेरी फार जुनी
तिच्यासारखे दुसरे नाही कुणी
गाजतो महिमा तुझा..
तू चराचरात दिसला दिसला         ..२

त्याच्या भयानं रोग दूर पळे
शरण जाता त्याचे सत्व कळेे
अभयावर त्याच्या आज..
सारा गांव हसला हसला              ..३

तुझ्या दर्शनाची लागली आस
सोडूनी भय टाकला निश्वास
लेकीच्या मायेसाठी तो..
दाट रानात घुसला घुसला            ..४

                            -भिवा रामचंद्र परब

 (ध्वनीमुद्रिका : ऐका जैतीर देवाची कहाणी) 

सनईच्या सुरात (Jaitir Dev)

सनईच्या सुरात...ढोलताशा कडाडतो
देवळाच्या मांडावर..देव जैतीर खेळतो         ..धृ

वाजप वाजते... ऐकू येतो मंजूळ सूर
जैतीराच्या उत्साहाला आला भक्तांचा पूर
तुरा चांदिचा, भक्त प्रेमाचा शिरी साजतो       ..१

पाने,फुले,पक्षी हे भक्तीमध्ये रमले
देवाच्या दर्शनाला भक्त सारे जमले
देव जैतीराच्या भयानं देवचार पळतो           ..२

गावाचे मानकरी बारा उभे राहिले
भक्ताच्या कल्याणाला गाऱ्हाण घातलं
देवाच्या अंगात येता विघ्नेही टाळतो             ..३

भक्तीरसात चिंब  न्हाऊनी निघाले
केळी, फुले देवाच्या पायांशी वाहिले
दाही दिशात, चराचरात महिमा गाजतो         ..४

                                 -भिवा रामचंद्र परब

(ध्वनीमुद्रिका : ऐका जैतीर देवाची कहाणी) 

तुळशीच्या देवा तुझे (Jaitir Dev)

तुळशीच्या देवा तुझे जैतीर पावन नांव
शरण मी आलो आता तूच धाव..तूच धाव         ..धृ

बैसलास तू मंदिरी गाभारी
नेत्र लाविली भक्तावरी
संकटाला धावशी नाही संशयाला वाव              ..१

भक्तावर येता संकटे मोठी
येई नांव पहिले तुझे ओठी
भक्तीत न्हाऊनी सारे देती तुला भाव               ..२

हाती घेऊन नंगी तलवार
उभा ठाकशी रक्षिण्या  सत्वर
भावभोळ्या भक्तीची आहे तुला हाव                ..३

कनवाळू तू, तू  कृपावंत
तुची आमचा खरा भगवंत
भव सागरात डोलते आज जीवन नाव              ..४

                                      -भिवा रामचंद्र परब

   (ध्वनीमुद्रिका : ऐका जैतीर देवाची कहाणी) 

Monday, 26 December 2016

गदिमांच्या शाहिरी वाड.मयाचा सुरेख परिचय

           राजा मंगळवेढेकर आणि कै.ग.दि.माडगुळकर यांची निकट मैत्री. गदिमांच्या इतर साहित्याची दखल समीक्षकांनी घेतली तरी त्यांच्या शाहिरी वाड.मयाची दखल  समीक्षकांनी घ्यावी तशी घेतली नाही, याची खंत राजाभाऊंच्या मनी होती व त्यासंबंधी गदिमांशी वारंवार चर्चा होई. त्यातूनच त्यांना शाहीर ग.दि.माडगुळकरहे पुस्तक लिहिण्याची कल्पना सुचली. वगनाट्य, तमाशा आणि चित्रपटासाठी त्यांनी जे जे शाहिरी वाड.मय लिहिले त्याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे.
            ज्या माणदेशातल्या खेड्यात त्यांचा जन्म झाला, त्या मऱ्हाटी मातीचा रंग आणि रग दोन्हीही त्यांना  उपजत लाभलेली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग बनली होती. त्या मातीतून झालेले लोकवाणी आणि संतवाणी यांचे सखोल संस्कारही भक्तीने, निष्ठेने आणि प्रेमाने अखेरपर्यत जोपासले आणि याच श्रद्धेने त्यांनी विपुल लिहिले. स्वाभाविकच त्या मातीचा एक अमिट ठसा त्यावर उमटविलेला आढळतो.
आठवा शाहीर 
           पेशवाईच्या काळातील राम जोशी,होनाजी बाळा,अनंत फंदी, प्रभाकर, सगनभाऊ आणि परशुराम हे सहा विख्यात शाहीर. राजाभाऊंच्या मते अलीकडच्या काळातील त्याच तोलामोलाचा शाहीर म्हणजे पठ्ठे बापूराव हा सातवा शाहीर आणि आठवा शाहीर म्हणजे ग.दि. माडगुळकर. भूपाळी, पोवाडा, लावणी, गण, गौळण हे प्रकार तर अस्सल मराठीचे वाण. माडगुळकरांनी हे प्रकार समर्थपणे हाताळले. त्यांची बहुतेक शाहिरी रचना चित्रपटाच्याच माध्यमातून रसिक प्रेक्षकांजवळ आली. त्यामुळे त्यांची शाहिरी उच्चवर्गीयापासून सामान्यांपर्यत पोहोचली.
           वग, गण, गौळण, लावणी, पोवाडा, स्वातंत्र्याची समरगीते अशा तेरा भागात गदिमांच्या वाड.मयाची विभागणी केलेली आहे. गदिमांनी मराठी संताच्या आणि शाहिरीच्या परंपरा उजळून टाकतील अशा दोन्ही प्रकारच्या गौळणी लिहिल्या आहेत. सर्वसाधारणपणे गवळणी मथुरेच्या बाजाराला जाताना त्यांना कृष्ण आणि सवंगडी त्यांना अडवितात आणि त्यांच्या शाब्दिक वादावादीतून नाट्य फुलते. त्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. विविध प्रकारचे स्त्री स्वभाव, कृष्ण, गोपी-राधा, यांचा विविध प्रेमाविष्कार आणि शृंगार मनाला मोहवितात. अशीच एक रांगडी गौळण, अवखळ शृंगाराने फारच सुंदर रीतीने रेखाटलेली आहे. एक धीट गवळण कृष्णाला बजावते.
एकवार सांगते कान्हा,
नको येऊ वाटेला पुन्हा
परवा धरलास हात,
कदंबाच्या वनात
पाप तुझ्या मनात
रंगावानी कावा तुझा काळा
राधा-आपल्या ठायी कृष्ण पहाणारी,कृष्ण जाणणारी, कृष्ण अनुभवणारी, तिचे वर्णन आपल्या प्रगल्भ प्रतिभेने केलेले आहे. एकही पैसा खर्च न करता कृष्णाला विकत घेणारी मातब्बर खरेदीदारीण म्हणजे राधा...    
नाहि खर्चिली कवडीदमडी,
नाहि वेचला दाम
बाई, मी विकत घेतला श्याम
माडगुळकरी लावणीत नायिका ग्रामीण आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीची तऱ्हा, रितभात, भाषा, संकेत हे सर्व जीवन ग्रामीण परिसरातील आहे. पण ग्रामीण असली तरी ती बिभत्सतेकडे झुकणारी नाही.  शृंगारातही ती संयमिनी आहे. कुलीन संस्कारी लेखणी आपला आब राखणारी आहे, सांभाळणारी आहे. ती काव्यात्म व कलात्मक आहे. जुन्या शाहिरांनी जशी लावणी स्फुरली तशीच ती गायली, तर गदिमांच्या बहुतेक लावण्या चित्रपटातील असल्यामुळे त्यांना विशिष्ट मर्यादा आहेत. त्यामुळे ती पसरट झालेली नाही. खरं तर शब्द तेच असतात, वेगळे नसते. पण रचनाच अशी खुबीदार असते की, त्यामुळे ते काव्यमय, नवीन वाटतात. कौशल्य सारे रचनेत आहेतगदिमा तर शब्दसम्राट होते. शब्दांवर त्यांची विलक्षण हुकुमत होती. त्यांच्या सदैव सतेज प्रतिभेतून ते नवनवीन रूप आणि आशय घेऊन अवतरत असत. त्यांची प्रतिभाही अशी की सहज बोलणे काव्य होऊन जावे
पदरावरती जरतारीचा
मोर नाचरा हवा
आई मला नेसव शालू नवा
या लोकप्रिय लावणीस तर लावणी म्हणण्यापेक्षा भावगीत म्हणणेच अधिक चांगले दिसेल आणि गदिमांच्या लावणीचे हेही एक वैशिष्ट्यच मानता येईल.
मर्यादशील संस्कार 
          गदिमांच्या एकदंरीत शाहिरीलाही एक मर्यादशील संस्कार लाभलेला आहे. अभिजात संस्कृत वाड.मयाशी त्यांचा परिचय होता. कथा, कीर्तने आणि घरगुती बाळबोध रितीभाती यांनी त्यांची प्रतिभा संस्कारित आहे. माडगुळकरांच्या लावणीतील लावण्यवतीचे वर्णन राजाभाऊंनी अतिशय मार्मिकतेने केलेले आहे. ते लिहितात, “शृंगारिक लावणीत ती आपली कुलीनता सोडत नाही. काव्यात्म पदर ढळू देत नाही. त्यांची लावण्यवती आपल्या ओठावरचे निरसे हसेआणि आंबट पिसेजपणारे आहे. भुवईच्या कमानीतराहून हसणारी, रात्री समईसंगे जळणारीआठवणीने उचकीसरशी हृदयाची पालखीवरखाली होणारी बोलाचा फुलवरावाहून प्रीतीच्या शंकराला पुजणारी, ‘तरूणपणाच्या बनाततिची तीच राखण करणारी, ‘अंतरंगी केवडा फुललेली’ ‘काळजाच्या तिजोरीतप्रीतीचा ठेवा जपणारी, ‘मिठी दिठीच्या नजर मिठीचासराव करू इच्छीणारी, नटूनथटून जळातली जलराणीबनून आशुकमाशुक माशाला जाळ्यावाचून गुंतवणूक ही चतुरिका सौंदर्यसारिका आहे.
न्हाऊन उभी ग राहून उद्वीशी केस
लक्ष्मी यावी सागरतळातून
परी तशी ग दिसतेस!
अशी अनेक अक्षरचित्रे गदिमांनी रचलेली आहेत.
            दिमांनी तीर्थक्षेत्र आणि देवतांवरसुद्धा लावण्या, गोंधळगीते, अभंग रचलेले आहेत. चित्रपटातील त्यांचे सवाल-जबाब वेगळ्याच वैशिष्ट्याने उठून दिसतात. त्यांचे सवाल जबाब म्हणजेच द्वंद्वगीतेच आहेत. त्याचे स्वरूप आक्रमक, लढाऊ असल्यामुळे तिथे दोघांत एकमेकांविषयी अवहेलनेची,तुच्छतेची भाषा येते आणि एकमेकांमध्ये दुसऱ्याला जिंकण्याची इच्छा, जिद्द फुरफुरत असते. त्यामुळे त्यांच्या भाषेत खणखणाट आणि झणझणाट अपरिहार्यपणे ऐकू येतो. देशभक्ती, स्वातंत्र्यप्रेम, राष्ट्रनिष्ठा या तेजस्वी भावना लोकमानसा पर्यत नेऊन त्या तिथे रुजविण्याच्या दृष्टीने पोवाडा हे फार प्रभावी साधन आहे. गदिमांनी पोवाड्याची ओजस्वी रचना केलेली आहे. पारतंत्र्याचे जू झुगारून देण्यासाठी भारताने  परकीय साम्राजसत्तेशी एक प्रदीर्घ झुंज दिली. लढा दिला. अनेक स्वातंत्र्यवीरांनी,देशभक्तांनी, नागरिकांनी स्वार्थत्यागपूर्वक हालअपेष्टा सोसून देहदंड भोगून, प्रसंगी प्राणाची आहुती देऊन भाग घेतला. त्यात कवी, लेखकही होते. गदिमांनी तेजस्वी स्वातंत्र्यगीते लिहून त्यातही आपले योगदान दिलेले आहे. वीर संभाजी, लो.टिळक आणि बेचाळीसची क्रांती यावर त्यांनी पोवाडे, सुंदर स्तवने रचलेली आहेत. असेच एक भारतमातेने सुंदर स्तवन,
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्र सूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे
मानवाचे जीवन हे सुख दु:खाच्या धाग्याने भरलेले आहे. परंतु सामान्य माणसाच्या आयुष्यात सुख पाहता जवाएवढे, दु:ख पर्वताएवढेअशी स्थिती असते. दु:खाच्या उन्हाळ्यात कधी जीव तगमगतो. तर कधी सुखाच्या जराशा झुळकीनेही जीव गुदमरतो. ऊनसावलीचा खेळ करविणारा कर्ता मात्र कुणालाच दिसत नाही. मात्र माणसांने आयुष्यात चांगले वाईट काम करताना या अदृश्य सूत्रधाराची जाणीव ठेवायलाच हवी, हा एकप्रकारे तत्वज्ञानाच्या पातळीवरचा अवघड विचार गदिमांनी एक धागा सुखाचा.....या पदात अत्यंत वैशिष्टपूर्ण शैलीत, वैशिष्टपूर्ण प्रतिमाद्वारे रसाळ, प्रासादिक केला आहे.
एक धागा सुखाचा,
शंभर धागे दु:खाचे,
जरतारी हे वस्त्र माणसां,
तुझिया आयुष्याचे
अशीही विविधरंगी, विविधढंगी शाहिरी गदिमांनी रचली. राजाभाऊंनी त्याच ढंगाने रसिकांना पेश केलेला गदिमांच्या शाहिरी वाड.मयाचा नजराणा नक्कीच आवडेल.

पुस्तकाचे नांव : शाहीर-ग.दि.माडगूळकर
लेखक : राजा मंगळवेढेकर
प्रकाशक : प्रतिमा प्रकाशन   
-भिवा रामचंद्र परब  
(पूर्व प्रसिद्धी : दै. लोकसत्ता रविवार पुरवणी)     

दर्यावरीsssदर्यावरीsss

दर्यावरीsssदर्यावरीsssगेला गो माझा भरतार
लाटावर लाटा पुसल्या वाटा भरून येतो ऊर...

हलदीचे अंग माझे,मेंदी अजून नाय सुकली
रातभर बाय गो आसवांत भिजते एकली
आली नांदाया सुखानं ग
आई बापाविना मी पोरं...
लाटावर लाटा पुसल्या वाटा भरून येतो ऊर...

समिंदर अमुचा देव, उदरी सोन्याची ठेव
कपाळीचे कुंकू माझ्या, घरधन्या सुखरूप ठेव
नवसाला पाव, दर्याराजा रं धाव
करू नको असा रं जोर...
लाटावर लाटा पुसल्या वाटा भरून येतो ऊर...

दर्या तुझी आम्ही लेकरं, करू नको आम्हां दूर
तुझ्या जीवावर, जीवावर  मिळवितो भाकर
आलंय तुफ़ान ठेव जरा भान,
होऊ नको असा निष्ठूर...
लाटावर लाटा पुसल्या वाटा भरून येतो ऊर...

दर्यावरीsssदर्यावरीsssगेला गो माझा भरतार
लाटावर लाटा पुसल्या वाटा भरून येतो ऊर...

-भिवा रामचंद्र परब



ओळख

ओळखीचे स्मित ओठावरच राहू दे
जागल्या हृदयव्यथा हृदयात साहू दे 

रंगीत स्वप्नांची माळ तुझ्या गळा
भंगलेली स्वप्ने मलाच पाहू दे

उशाला चंद्र घेऊन निजतेस तू
दगडाची जीवघेणी कळ मला साहू दे

फुललेला संसारात ना अश्रुविमोचन
पावसाच्या तरी अंगावर मला झेलू दे

दाटलेल्या हुंदक्यात आठवणी गुंता 
एकवार मलाच उलगडून पाहू दे 
                  
                            -भिवा रामचंद्र परब    

सफर लंबा है...

सफर लंबा है, रास्ता तय करना है
आशिक हुँ प्यार का, फिर मिलना है

सागर की तरह, तुफ़ा उफानता दिल में
थाम ले हाथ, हर बार तुझे मुस्कराना है

रातों की बाहों में, याद सतायेंगी पलपल
वादा रहा, दिल को याद में बहलाना है

मझदार में बहकर ये मीत ना कभी भुलना
जिंदगी तेरी है, सिर्फ इंतजार करना है

गालों पे झिलमिलते आँसु, बन गया शायर
बिछुड्ना अभी, इक दिन जरूर मिलना है

-भिवा रामचंद्र परब

Thursday, 22 December 2016

जाणीव-वेणा

स्थळ : विद्याविहार सारखंच उपनगरातील
एक रेल्वे स्टेशन.
एक नंबर प्लेटफॉर्म बाजूला
रेल्वे कार्यालयाच्या समोर मोकळी जागा.
सकाच्या पारी येणाऱ्या-जाणाऱ्यांची तौबा गर्दी,
तो ही या गर्दीतलाच होऊन गेलेला.
लोंढ्याबरोबर नेहमीच्या शिरस्त्याने चालणारा.
खिंडकीकडे तिकिटासाठी रांग;
तोही त्याच रांगेतला एक प्रवाशी.
अचानक त्याची नजर गेलीअंग शहारलं,
एक ओली बाळंतीन विव्हत होती.
कोनाड्यातल्या दगडमातीतघाणीत.
चारही बाजूला घोंघावणाऱ्या माश्या;
भिकारीण,कचरा गोळा करणाऱ्यापैकीच
एक असावी ती!
ती दयेची भीक मागत होती.
तिच्या तोंडातून आवाज येत नसला तरी
आकांत करून तिचा घसा सुकलेला.
कितीवे  झाला असेल?
पहाटेला केव्हातरी सुटका झालेली असावी.
तिच्या चारी बाजूला रक्ताचे थारोळेसुकलेले.
एकाच नाळेने बा आणि आई बांधली गेलेली!
ना मध्येच लोंबकत होती.
एकंदर दृश्य किसवाणे पण
बाजूला सुंदर,नाजूक,गोरेपान बा
कुणीही उचलून घ्यावे असेरक्तालेले,
निपचितपणे पडून होते.
जिवंत असेल काकोण जाणे..
तो सोहळा पाहून पुरूष हळूच मान फिरवित होते.
होहोसोहळाच होता तो!
स्त्री ने अर्भकाला जन्म देण्याचा सोहळा,
स्त्री साठी कृर्ताथेचा क्षण देणारा सोहळा,
स्त्री नावाला आईरूप देणारा सोहळा,
स्त्री चा आई नावाने पुनर्जन्म जणू!
पण आज हा उत्सव आनंदाचा
खचितच नव्हता.
मुत्यूपंथाला लागलेल्या स्त्रिचे नजरेने              
लचके तोडू पहात होता समाज.
माणसांची गर्दी होतीगर्दीत माणूस नव्हता.
दया येऊन काहीजण तिच्या पुढ्यात
दहा-पाचच्या नोटा फेकून पुढे जात होते.
माणुसकी दाखविण्याचा तोच एक
सोपा मार्ग असावा!
बाया बापड्या नग्न लाजेने चूर होत
नजर ववून पुढे जात राहिल्या.
त्या स्त्रिचा आक्रोश आता मंदावत चाललेला.
रेल्वेचा अधिकारी निगरगट्ट,
आपल्या दगडी केबिनमध्ये बंद.
एका भिकारिणीच्या वेदनेची किंमत ती काय?
त्याच्या दृष्टीने ती उकिरड्यावर लोली असेल;
निसर्गानं आपलं काम चोख बजावलं इतकचं!
यात कसलं आलंय कौतूक?
प्राणी पक्षी असेच वितात
जंगलातील झाडाझूडपात,रस्त्यावर,उकिरड्यावर.
कोण असतो त्यांच्याबरोबर?
देवनिसर्गछे!
त्यांच्याबरोबर असते ते त्यांचे स्वयंप्रेरित ज्ञान;
जन्मत: निसर्गाने बहाल केलेली स्वावलंबनाची दृष्टी.
मनुष्य प्राणी तर कायमचाच परावलंबी;
जन्मापासून मुत्यूपर्यत.
पण त्याच उकिरड्यावर उमललं होतं
एक छान,सुंदरसं फूल.
कोमेजून जात होते डोळ्यादेखत ..
माणुसकीभावनावेदनासंवेदना ही
लोपली होती.
यावेळी स्त्रिला गरज होती ती मायेची,
स्त्रिच्याच एका प्रेम स्पर्शाची.
पण एक आईच आज मरणासन्न होती.    
ज्याने हे पाप केले असेल तो आपल्या घरात
निद्रिस्त असेल
कदाचित या पापाची त्याला कल्पनाही नसेल,
पण त्याचा हा हिशोब नक्की कोठेतरी
मांडला जाईल. असं कोणीतरी म्हणालंसुध्दा!
निव्व भाबडेपणा! दुसरं काय?
तिच्या अंगावर कपडे असे नव्हतेच.
जे फाटके काही अंगावर होते
त्यानी अंग झाकण्याचा अयशस्वी प्रयत्न करून                
जणू स्त्रीची लाजअब्रू ती झाकत होती
भिकारीण का असेनाशेवटी ती एक स्त्रीच.
अचानक त्याच्या लक्षात आले;
तिकिटासाठीची रांगही आता वाढू लागली होती.
लोकांच्या बुभूक्षित नजरा थेट भिरभिरत
तिच्या देहावर स्थिरावलेल्या.
नजरांनीच त्या देहाची चिरफाड चालली होती;
श्वापदं वत होती आतल्या आत.
गर्दी हेही विसरली होती,
अशाच एखाद्या स्त्रीच्या पोटी आपणही जन्म घेतला!
त्याच्या अंगात कपडे होते.
त्याक्षणी अंगातील शर्ट काढून त्या स्त्रीच्या
उघड्या देहावर वस्त्र पांघरावे वाटले त्याला;
पण क्षणभरच! त्या आड आली ती त्याची
पांढरपेशी मध्यमवर्गीय संस्कृती!
त्याने मनाचा हिय्या केला आणि खिशातला
वीतभर रूमाल तिच्याकडे फेकला.
तीला तर शुध्दच नव्हतीफक्त कण्हत होती ती!
आणि चमत्कार झाला (असं त्याला वाटले)
विणीच्या वेदना पचवलेली एक प्रौढा पुढे आली.
तिनं अंगावरची ओढणी त्या स्त्रिच्या अंगावर
पसरली हळूवारपणेमायेने.
समोरच्या सायबाच्या केबिनचे दार धाडकन
आपटत तीनं साहेबाला खडसावले:
क्या करेये तो हमारा काम नही है ना बहेनजी
अरेफिर किसका काम है?
रेल पुलीस या पुलीस का
तो तू इधर क्यूँ बैठा हैतुमची मुलगीबायको
अशी रस्त्यावर तडफडत असती तर..
काय केलं असतं?  
वेदनेचा आवेग तिलाही आवरेनासा झाला.
आणि राष्ट्रीयभाषेवरून ती मातृभाषेवर आली.
हा आपलेपणाचा घाव मात्र वर्मी लागला.
शेवटी तोही माणूसच!
बाहेर बघ्याबरोबरच आता बायकांही गोतावळा
जमू लागलाकालवाकालवी वाढली.
पंधरा मिनिटात सुत्रे हालली.
इस्पितळाच्या वाहनातून आई आणि बा
पुढच्या प्रवासाला निघाले.
तो प्रवास कसा झाला असेल ते मला
तरी एक अज्ञातच!
ते बाळ जिवंत असेल तर,
काय लिहील सटवी त्याच्या ललाटलेखात?                
आईसारखंच बेवारसपणरस्त्यावरचा भिकारी
की सुशिक्षित समाजाचा एक घटक?
००००
नजरेआड अशा कितीतरी  घटना घडतात;
त्याचा ना हिशोबना ताळेबंद!
पण समोर जेव्हा घडतं तेव्हा,
ज्याची सद्विेवेक बुध्दी शाबूत आहे,
असा एखादा कळळतो;
मायेने,स्त्री वेदनेच्या जाणिवेनं एखादी धावत येते;
ती खूण असते खऱ्या माणुसकीची!
तो माणूस असतो तुमच्या-आमच्यात.
अशाच माणसांनी सुजाण समाज घडत असतो.
पण तत्क्षणी एक विचार मनात तरळून गेला.
ती भिकारीण असोनाही तर स्वत:ला सभ्य
समाजातील म्हण़विणारी कुणी स्त्री,
आईच्या आधी ती स्त्रीच असते
आपल्या देहाचा आपल्या वेदनांचा असा
बाजार तिलाही नको असतो,
पण वेदनांचा कस ती निमूटपणे सहन करते;
अतोनात कष्ट करते केव आपल्या बाळासाठी!
याच समाजाचा घटक बनलेला हा बा
कितपत जाणीव ठेवतो या सर्वाची?
तो सतत सानिध्यातच असतो स्त्रिच्या.
ती स्त्री एकतर आई असते नाहीतर बायको.
बायको घरात आली कि सुटला जातो आई
नावाच्या स्त्रिचा हात आपोआप
आणि सुरू होतात तिच्या आयुष्याचे दशावतार.
पैलतीराकडे डोळे लावलेली स्त्री शेवटी सख्ख्या
पोराच्या मायेलाही परकी होते.
अर्थात याला अपवाद असतीलही
०००
हे सारं पाहिल्यावर वाटलं,
अर्भकाचा जन्म होताचक्षणी पाचव्या दिवशी
सटवीनं एक करायला हवं;
आईची जाणीव राहील अशी भणारी एक वेदना
त्याच्या ललाटी लिहायला हवी जन्मभरासाठी,
मातेचे महन्मंगल स्तोत्र हाच त्यावर जालीम उपाय असेल!
००००० 
-भिवा रामचंद्र परब